स्थानिक बातम्या

मेहरूणच्या गणेश घाटावर अस्वच्छतेचे ‘ग्रहण’; जळगावचे वैभव कचऱ्याच्या विळख्यात!

जळगाव:दि. 27 शहराचे नैसर्गिक सौंदर्य आणि पर्यटनाचे प्रमुख केंद्र असलेला मेहरूण तलाव सध्या दुरावस्थेच्या गर्तेत सापडला आहे. तलावाचा महत्त्वाचा भाग असलेल्या ‘गणेश घाटावर’ मोठ्या प्रमाणात अस्वच्छता पसरली असून, येथे घाणीचे साम्राज्य निर्माण झाले आहे. महापालिका प्रशासनाचे याकडे असलेले दुर्लक्ष आणि काही बेजबाबदार नागरिकांच्या सवयींमुळे तलावाचे सौंदर्य धोक्यात आले आहे.

घाणीचे विदारक दृश्य

गणेश घाटावर सध्या प्लास्टिक पिशव्या, निर्माल्य, खाद्यपदार्थांचे वेष्टन आणि बाटल्यांचा खच पडलेला पाहायला मिळत आहे. काही ठिकाणी कचरा कुंड्यांची अवस्था दयनीय असून, लोक कचरा कुंड्यांमध्ये न टाकता बाहेरच फेकत असल्याचे चित्र आहे.

 

 

प्रशासनाकडून ठोस उपाययोजनांची प्रतीक्षा

जळगाव महानगरपालिका प्रशासन स्वच्छतेचे दावे करत असले तरी, प्रत्यक्षात गणेश घाटावरील स्थिती काही वेगळीच आहे. प्रशासनाने येथे कचरा उचलण्याची नियमित व्यवस्था करणे आणि कचरा टाकणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करणे आवश्यक आहे. अलीकडेच जळगाव महापालिकेने स्वच्छतेचे ‘इंदूर मॉडेल’ राबवण्याची तयारी दर्शवली आहे, मात्र त्याची अंमलबजावणी मेहरूण तलावापासून व्हावी, अशी मागणी जोर धरत आहे.

नागरिकांचीही जबाबदारी महत्त्वाची

केवळ प्रशासनाला दोष देऊन चालणार नाही, तर मेहरूण तलावावर फिरण्यासाठी येणाऱ्या पर्यटकांनी आणि स्थानिक नागरिकांनीही स्वच्छतेचे भान ठेवणे गरजेचे आहे. निर्माल्य तलावात किंवा घाटावर न टाकता प्रशासनाने दिलेल्या कलशातच टाकणे हे प्रत्येक सुजाण नागरिकाचे कर्तव्य आहे.

Spread the love

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button