विधानपरिषदेत घुमणार तापी-पूर्णा खोऱ्याचा आवाज; अभ्यासू नंदूभाऊ महाजन सज्ज!
नंदूभाऊ महाजन : जनमानसात रुजलेलं अभ्यासू नेतृत्व, विधानपरिषदेसाठी सज्ज!


जळगाव:दि.16 आजच्या बदलत्या राजकीय पटलावर सत्तेसाठी वारंवार भूमिका आणि पक्ष बदलणारे नेते जळगाव जिल्ह्याने पाहिले आहेत. अशा अस्थिर राजकीय वातावरणात सामान्य माणसाचा लोकशाहीवरील विश्वास डळमळीत होत असताना, आपल्या राजकीय जीवनाच्या सुरुवातीपासून एकच पक्ष आणि एकच झेंडा सोबत ठेवणारे प्रामाणिक नेतृत्व म्हणून नंदूभाऊ महाजन यांच्याकडे पाहिले जाते. विधानपरिषदेसारख्या महत्त्वाच्या निवडणुकीत पक्षाने त्यांना उमेदवारी बहाल केल्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये मोठा उत्साह असून, यंदाची लढाई महायुतीच्या भक्कम साथीने सोपी झाली असल्याचे चित्र आहे. तांदलवाडी गावाला दुसऱ्यांदा ‘आमदार’ पदाचा बहुमान नंदूभाऊ महाजन यांच्या रूपाने मिळणार असल्याच्या चर्चेवर आता जळगाव जिल्ह्यात शिक्कामोर्तब होत आहे.
स्पष्टवक्तेपणा आणि माणुसकीची जपणूक
आजच्या राजकारणात शब्द आणि कृती यात मोठी दरी पाहायला मिळते. मात्र, नंदूभाऊ महाजन याला अपवाद आहेत. जे मनात तेच ओठावर, हा त्यांचा स्वभाव असून जनतेच्या प्रश्नांवर किंवा कार्यकर्त्यांच्या हक्कांसाठी बोलताना ते कोणाचीही भीडभाड ठेवत नाहीत. निवडणुकीच्या काळात अनेकदा समाजात जातीपातीचे राजकारण केले जाते. परंतु, नंदूभाऊंनी आपल्या सार्वजनिक जीवनात कधीही जाती-पातीच्या चौकटी स्वीकारल्या नाहीत. त्यांच्या मते, ‘माणुसकी’ हाच एकमेव धर्म आणि ‘माणूस’ हीच एकमेव जात आहे.
शेतकरी समाजासाठी आशेचा नवा किरण
नंदूभाऊ महाजन यांनी जिल्हा परिषद उपाध्यक्ष म्हणून काम करताना संपूर्ण जिल्ह्यातील ग्रामीण विकासाची कास धरली. त्यांच्या जिल्हा परिषद व जिल्हा बँकेच्या संचालक पदाच्या कार्यकाळात सर्व सहकारी सदस्यांचे मोठे पाठबळ त्यांच्या पाठीशी राहिले. तापी, पूर्णा आणि गिरणाकाठच्या शेतकरी समाजासाठी ते आता आशेचा नवा किरण ठरत आहेत. मतदारसंघामध्ये आमदारकीसाठीजी कोणी नेता नव्हे, तर एक कुटुंबप्रमुखच निवडणूक लढवत असल्याची भावना जनतेमधून व्यक्त होत आहे.
महायुतीची भक्कम साथ; विक्रमी विजयाचा विश्वास
जळगाव जिल्ह्यात महायुतीच्या नगरसेवक व नगराध्यक्षांना जनतेचा प्रचंड कौल मिळाला असल्याने भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसची एकत्रित ताकद उमेदवार नंदकिशोर महाजन यांच्या पाठीशी भक्कमपणे उभी आहे. गेल्या २५ वर्षांतील त्यांची सर्वसमावेशक छबी ही त्यांची जमेची बाजू आहे.
“पक्ष दोन नव्हे चार डोळ्यांनी पाहत असतो, हे नंदकिशोर महाजन यांनी उमेदवारी जाहीर झाल्यावर मांडलेले निरीक्षण तंतोतंत खरे आहे. महायुतीतील सर्व मतदार-लोकप्रतिनिधी आपली पक्षनिष्ठा व महायुतीचा धर्म नक्की निभावतील आणि हा विजय ऐतिहासिक असेल.”
— चंद्रकांत बाविस्कर (जिल्हाध्यक्ष, भाजपा)
पहिल्यांदाच खरा शेतकरी विधानपरिषदेची पायरी चढणार!
जळगाव जिल्ह्यातील स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातून आतापर्यंत व्यापारी किंवा बड्या नेत्यांच्या मर्जीतील व्यक्तीलाच आमदारकीची संधी मिळत आल्याचा इतिहास आहे. मात्र, विधानपरिषद हे कायदे करणारे वरिष्ठ सभागृह असल्याने तिथे अभ्यासू आणि संवेदनशील नेतृत्व जाणे गरजेचे आहे.
यंदा नंदूभाऊंच्या रूपाने खऱ्या अर्थाने जमिनीशी जोडलेला शेतकरी आणि ग्रामीण-नागरी प्रश्नांची उत्तम जाण असणारा लोकनेता सभागृहात पोहोचणार असल्याने, जनतेच्या प्रश्नांना अधिक प्रभावी आवाज मिळेल, असा ठाम विश्वास जिल्हाभरातून व्यक्त केला जात आहे.




